ठाणे : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जाज्वल्य विचारांचे जागरण करण्यासाठी श्री कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने सहयोग मंदीर येथे शनिवारी, सायंकाळी ६ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन साहित्य संस्कती मंडळाचे सदस्य रविंद्र गोळे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पोवाडे, कविता, कथा, कादंबरयामध्ये पेरत वंचित, शोषित अशा निद्रिस्त समाजाला जागवणारे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या विचारांचे जागरण व्हावे व भावि पिढीला त्यातुन प्रेरणा मिळावी म्हणून श्री कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सहयोग मंदीरमध्ये शनिवार, सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रमा होणार आहे. . महाराष्ट्र शासन साहित्य संस्कती मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र शासन महात्मा फुले चरित्र साधन समितीचे सदस्य रविंद्र गोळे हे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने समिर कांबळे यांनी केले आहे.