पालघर : पालघरमधल्या आगवनमध्ये तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैंवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी मृत मुलींची नावं आहे.
बुधवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून पालघरमधील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केलं. दोन्ही मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने माच्छी कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.