शिवसेना- भाजप सत्तेच्या वाटपासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याचं भयंकर पाप करत आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, युतीला जनतेने बहुमत दिलं असतानाही सत्ता स्थापन करत नसतील तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याचं पाप भाजपा, शिवसेना करत आहे. फक्त मुख्यमंत्रीपदासाठी जे काही भांडण सुरु आहे त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं मोठं पाप होत आहे”.
निवडणुकीत महायुती म्हणून मतं मागितली, प्रचार केला. आणि आता महाराष्ट्रात सत्ता स्थापन कोणी करायची हा पोरखेळ का लावला आहे?,” अशी विचारणा धनंजय मुंडे यांनी केली आहे.