दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सत्तासंघर्षावरून तोडगा काढण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. परंतु, शाह हे फडणवीसांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही. अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना सत्तेच्या समसमान वाटपावरून आक्रमक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात ओला दुष्काळ पडलेला आहे. त्याची माहिती देण्यासाठी अमित शाह यांची भेट घेतली. केंद्राकडे मदतीसाठी मी दिल्लीत आलो होतो. संपूर्ण माहिती दिली. विमा कंपनीशी बोलणार आहेत असे त्यांनी सांगितले. केंद्रातील पथक पहाणी करण्यासाठी येणार आहेत. अशीही माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अकरा दिवस उलटूनही युतीमधील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आमच्याकडे 175 आमदर आहेत. जर भाजपाकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्ता स्थापन करावी असे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना आपल्या भूमिकेवर अद्यापही नाराज आहेत.