मुंबई : अरुण जेटलींनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला असून ही निव्वळ जुमलेबाजी आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलीय. रब्बी हंगामात दीडपट हमीभाव वाढवून दिल्याचं अर्थमंत्री सांगत असले तरीही वस्तुस्थिती तशी नाहीये. तसंच जीडीपी वाढला असं सांगितलं गेलंय तर मग त्यानुसार व्यापार कुठे वाढलाय. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारने न केलेल्या प्रगतीचा अर्थमंत्र्यांनी कागदोपत्री मांडलेला निव्वळ देखावा आहे, असंही विखे पाटलांनी म्हटलंय.
रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कृषि मूल्य आयोगाने केलेले दरच केंद्र सरकारने हमीभाव म्हणून जाहीर केले आणि हे दर उत्पादन खर्चाच्या दीडपट नफा देणारे नाहीत.@INCMaharashtra #Budget2018 pic.twitter.com/OZNkwigBrS
— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 1, 2018
विखे पाटील म्हणाले, ”एकलव्य शाळा आदिवासी मुलांसाठी आणणार, हे बोलताना एकलव्य शब्दाला ते अडखळले. यावरूनच त्या शाळांचं धोरण अजूनही नीट तयार नाही. आणि कुठल्या २० लाख मुलांना शाळेत पाठवणार? त्यामुळे हे बजेट म्हणजे, एकलव्याचा अंगठा मागणार्या द्रोणाचार्याचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सामान्य जनता आता या जुमलेबाजीला अजिबात बळी पडणार नाही.”