नवी दिल्ली : जवानांच्या नावाचा वापर करुन राजकारण करणा-या केंद्र सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. सीमारेषेवरील तैनात निमलष्करी दलातील ९० हजार सैनिकांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील भत्ता मिळाला नाही. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, सैन्य दलातील जवानांना चाईल्ड एज्युकेशन भत्ताही देण्यात आला नाही. निधीची कमतरतेमुळे हे भत्ते थांबविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी असून चालू आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये भारताची महसुली तूट वाढवण्याची दाट शक्यता आहे. असा दावा बँक ऑफ सिक्युरिटीजनं त्यांच्या अहवालानूत केला आहे. चालू आर्थिक वर्षात महसुली तूट एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.८ जाऊ शकते. असा बॅंक ऑफ अमेरिकेचा अहवालातून सांगण्यात आले आहे. देशातील या आर्थिक मंदीचा फटका उद्योजक व्यापारी यांच्यासह नोकरदारांनाही बसत आहे.