Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेश'पद्मावत’ वाद पुन्हा न्यायालयात!

‘पद्मावत’ वाद पुन्हा न्यायालयात!

नवी दिल्ली: संजय लीला भन्साळी निर्मित पद्मावतचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात पोहोचला आहे. सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिल्यानंतरही देशातील काही राज्यांनी घातलेल्या बंदीच्या निर्णयाला भन्साळी यांनी आव्हान दिलं आहे. त्यांच्या या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देते, याबाबत उत्सुकता आहे.

‘पद्मावती’ चित्रपटावरून देशभर गदारोळ झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं एक विशेष समिती नेमली होती. त्यात राजपूत संघटनांच्या प्रतिनिधींसह काही इतिहासकारांचाही समावेश होता. या समितीनं चित्रपट पाहिल्यानंतर त्यात नावासह सुमारे ३०० कट सुचवले. त्यानुसार बदल झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं ‘पद्मावत’ला मंजुरी दिली. त्यानतंरही राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय तेथील सरकारनं घेतला आहे. काल यात हरयाणाचीही भर पडली. देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शित न झाल्यास निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सेन्सॉर बोर्डानं परवानगी दिल्यानंतरही चित्रपटाची अडवणूक का केली जात आहे, असा त्यांचा सवाल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments