नवी दिल्ली – राजधानीत गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होत आहेत. आजही धुक्याच्या प्रभावामुळे २८ रेल्वे रद्द कराव्या लागल्या आहेत. तर ३६ रेल्वे उशीरा धावत आहेत. धुक्यामुळे वाहनधारकांचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे.
दिल्लीत प्रदूषणाची पातळीही चिंताजनक आहे. शनिवारी राजधानीत ४.२ डिग्री सेल्सियस एवढे सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले आहे. सकाळी साडेआठ वाजतापर्यंत ४०० मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदविण्यात आली आहे. दिल्लीकरांना सध्या प्रदूषण आणि धुक्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अपघाताचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.