नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांना फटकारले आहे. भीक मागण्यापेक्षा पकोड्यांचा ठेला चालवणे चांगलेच आहे, असे अमित शाह यांनी राज्यसभेत म्हटले होते.
भारतातील तरुण उच्च शिक्षित व प्रतिभावान असून त्यांना भाजप सरकार भजी विकण्याचा सल्ला देते, हे दुर्दैवी असल्याचे काँग्रेस खासदार रंजित रंजन यांनी म्हटले आहे. मागील कुठल्याही सत्ताधारी पक्षाने अशाप्रकारचे वक्तव्य केले नसल्याचेही ते म्हणाले.
जीएसटीला भाजपची लोकांना लुटणारी योजना संबोधत काँग्रेस नेते नासिर हुसेन पुढे म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीतून त्यांना काय मिळाले हे लोकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हारता हारता वाचली. तसेच, पश्चिम बंगाल व राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपला पराभव स्वीकारावा लागला.