Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यमीठ-पाण्याच्या सेवनाने अनेक आजारांपासून बचाव

मीठ-पाण्याच्या सेवनाने अनेक आजारांपासून बचाव

कामाच्या धावपळीत अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराचेही प्रमाणही वाढतात. त्यामुळे प्रत्येक जण तंदुरुस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक आजारांपासून लांब राहण्यासाठी नियमित काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे बऱ्याच हानीकारक समस्या उदारणार्थ स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मीठ-पाण्यामुळे फक्त मधुमेहच नाही, तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे पाणी प्यावे. त्यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात.

त्वचा विकार : या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात.

वजन कमी करणे : कोमट पाण्यातून काळे मीठ प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्टेरॉलदेखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments