skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईफडणवीसांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली : संजय राऊत

फडणवीसांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली : संजय राऊत

Increase in security of Sanjay Raut, Y level of security

मुंबई: महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले असा गौप्यस्फोट भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केल्यानंतर सत्ताधारी संतप्त झाले आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. फडणवीसांनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. असं टीकास्त्रं सोडलं.

भाजपाचे कर्नाटकातील नेते अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी खळबळ उडाली. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निधी परत केंद्राकडे पाठवला, असं हेगडे म्हणाले होते. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments