मुंबई : गिरणी कामगार उद्यापासून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. विषय जुना असून भाजपा सरकारनेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
काय आहेत मागण्या…
१.गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित आहे.
२.सरकारकडून घरांबाबत फक्त आश्वासनं दिली जातात, कार्यवाही मात्र होत नाही.
३.गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक घेतली नाही.
४.३०० चौ.फुटांवरून ४०० चौ.फुटा घरांचा निर्णय झाला, पण अजूनही सरकारने अध्यादेश काढलेला नाही.