मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. सत्तास्थापनेचा पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अजित पवारांची मनधरणी सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी ‘हम होंगे कामयाब!’ असं सूचक टि्वट केलं आहे.
अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाविकास आघाडी थेट न्यायालया पोहोचल्यामुळे सध्यातरी पेच कायम आहे. अजित पवार यांच्याविरोधात काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना असताना त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
काय आहे ट्विटमध्ये….
अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की,
तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …
हम होंगें कामयाब ।@NCPspeaks @MumbaiNCP— Nawab Malik (@nawabmalikncp) November 25, 2019
अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की,
तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की …
हम होंगें कामयाब ।