मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करणा-या भाजपला मतदारांनी पुन्हा नाकारले. भाजपचे सर्व नेते आपला रोखण्यासाठी कामाला लागले होते. त्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रा.अमोल मिटकरींनी जोरदार टोला लगावला. अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन केले.
दिल्लीतील भाजपा ची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीला प्रचाराला बोलावल्यावर खऱ्या अर्थाने उतरती कळा लागलीय. यावर मा. मोदीजी व अमित शहाजी यांनी चिंतन करायला हवे. अहंकारी वृत्ती ला नाकारल्या बद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन ll@PawarSpeaks @supriya_sule
— Amol mitkari (@amolmitkari22) February 11, 2020
अमोल मिटकरी म्हणाले, दिल्लीत भाजपची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीला प्रचाराला बोलावल्यावर ख-या अर्थाने उतरती कळा लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी चिंतन करायला हवे. अहंकारी वृत्तीला नाकारल्याबद्ल दिल्लीकरांचं अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सुध्दा भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
दिल्लीमध्ये आप तिस-यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह असून जल्लोश करत आहेत. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या आपने भाजपला जोरदार धक्का दिल्यामुळे भाजपवर सर्वच नेत्यांनी जोरदार हल्ला चढविला आहे.