Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदिल्लीचा निकाल देशभरात बदलाचं वातावरण : शरद पवार

दिल्लीचा निकाल देशभरात बदलाचं वातावरण : शरद पवार

Sharad Pawarमुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपला जोरादार टोला लगावला. दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे.

भाजपचा पराभव आता थांबणार नाही,’ असा ठाम दावा शरद पवारांनी केला. दिल्लीमध्ये आपला जोरादार यश मिळालं आहे. विशेष म्हणजे केजरीवाल तिस-यांदा दिल्लीचं मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. भाजपने आपला सत्तेपासून रोखण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली होती. मात्र, मतदारांनी केजरीवालांच्या विकास कामाला साथ दिली. त्यामुळे दिल्लीत केजरीवालांनी मुसंडी मारली.

शरद पवारांनी अरविंद केजरीवालांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments