मुंबई : सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. शिवसेनेनं कुठलंही पाऊल मागे घेतलेलं नाही. जर शब्द दिला आहे तर भाजपनं युती धर्माचं पालन करावं. राजकारणात सर्वांना सर्व पर्यायं खुलं आहे. भाजपाकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी सत्तास्थापन करावा असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.
विधानसभेच्या निकालाला आठ दिवस उलटून युतीच्या सत्तास्थापनेचा पेच कायमं आहे. शिवसेना सत्तेच्या समसमान वाटपावरून ठाम आहेत त्यामुळे सत्तास्थापनेसाठी युतीत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना गटनेता निवडण्यासाठी आज बैठक घेणार आहेत. बुधवारी भाजपाने देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांची गटनेतेपदी निवड केली. परंतु युतीकडे सत्तास्थापन करण्या इतका आकडा असतांनाही सत्तेच्या वाटपावरून शिवसेना आक्रमक झाली आहे.
शिवसेना आक्रमक असल्यामुळे भाजपचे नेतेही आमक्रम होतांना दिसत आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनीही आम्हालाही पर्यायं उपलब्ध असल्याचे विधान बुधवारी केले. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाब तंत्र टाकण्यात येत असल्याच चित्र सध्या तरी दिसून येतं आहे.