नागपूर : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सहा महीने चालेलं असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारले. त्यावेळी पवारांनी फडणवीसांना टोला लगावला सांगितले. मी फडणवीसांना ओळखतो पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळलं, यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर दौ-यावर आहेत. यावेळी नागपूर येथे आज रवी भवन येथे पत्रकार परिषदेत पवारांनी विविध विषयावर भाष्य केले.”‘राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. राज्यात स्थिर सरकारच स्थापन होईल, हे सराकर पाच वर्ष चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पुन्हा येणार असं म्हणत टोला लगावला.
राज्यातील एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यावर सध्या चर्चा सुरू आहेत. सध्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असून ती प्राथमिक टप्प्यात आहे. ज्यावेळी त्यावर काही ठोस निर्णय होईल, त्यावेळी फॉर्म्युला सर्वासमोर उघड केला जाईल,” असं पवार यावेळी म्हणाले.