नागपूर : भाजपच्या जागा जास्त आल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. भाजपने १०५ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असाही विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं.
गडकरी यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले. फडणवीसांनी गडकरी समर्थकांचे तिकीट कापल्यामुळे गडकरी नाराज आहेत अशी चर्चा सुरु होती. मात्र गडकरीनीं फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशीच अपेक्षा व्यक्त केली. संघ आणि सरकारचा कोणताही संबंध नाही. त्यांच्या हस्तक्षेपाचाही प्रश्नच येत नाही. तसे संबंध जोडणेही चुकीचेचं आहे.