Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदिल्लीकरांनी मोदींचं ऐकलं, देशद्रोही भाजपला नाकारलं; नवाब मलिकांचा टोला

दिल्लीकरांनी मोदींचं ऐकलं, देशद्रोही भाजपला नाकारलं; नवाब मलिकांचा टोला

Nawab Malik , Narendra Modiमुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारलं असल्याचा हल्लाबोल मलिक यांनी केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्याचं ऐकलं असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकलं आहे’, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचं समोर आलं आहे. दुपारी बारेवाजेपर्यंत ‘आप’ला ५८ तर भाजपला १२ जागांवर आघाडी मिळाली असल्याचं चित्र आहे. आम आदमी पक्षाने बहुमत गाठले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments