निर्मल (तेलंगणा) : महाराष्ट्र विकास आघाडीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी उपहासात्मक टीका केली. ओवेसी म्हणाले, “भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार काँग्रेसनं शिवसेनेसोबत, शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत लग्न केलं. तर भाजपाचा शिवसेनेसोबत घटस्फोट झाला. काँग्रेसनं शिवसेने पक्ष प्रमुखांना उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवलं आहे,” अशी कोपरखळी ओवेसी यांनी चारही लगावली.
सध्या तेलंगणातील निर्मल येथील महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. ओवेसी म्हणाले,”महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार काँग्रेस पक्षानं शिवसेनेसोबत विवाह केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत चौथा विवाह केला. एआयएमआयएला देशविरोधी म्हणून शिव्या देणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेचा तलाक झाला. आता तर काँग्रेसनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवलं आहे.
महाराष्ट्रात एकच पार्टी…
काँग्रेस भारतीय पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार शिवसेनेसोबत विवाह करते आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. मी जाणून घेतलं. तेव्हा कळलं की, महाराष्ट्रात एकच पार्टी आहे, ज्याविरोधात बोलणं गरजेच आहे. नाही बोललो, तर मग कुणाचंही मत मिळत नाही, अशी चारही पक्षांची अवस्था आहे,” असं ओवेसी म्हणाले.