मुंईब : भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजपचे नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका करत आहेत. विरोधकांना उत्तर देतांना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. विरोधकांना आता बरनॉलची गरज असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तास्थापन केल्यामुळे भाजपने दररोज शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. भाजपचे नेते दररोज विविध वाहिण्यांवर, सोशल मीडियावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे ज्या दिवसापासून शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार हे चित्र स्पष्ट झाले होते त्या दिवसांपासून टीकास्त्र सुरु झालं होतं. भाजप मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु उध्दव ठाकरेंकडून त्यांना प्रतिउत्तर मिळत आहेत.
शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या दररोज फैरी झाडल्या जात आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाविरोधात भाजपा हल्लाचढवत आहे. सरकारचा निर्णय कसा चुकाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.