मुंबई : काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्राचे प्रभारी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष नंतर विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. मात्र, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे.
राज्यातील सरकार स्थापनेतील पेचावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्याच बुधवारी 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत