नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस या भयंकर विषाणूचा संसर्ग आता तब्बल ८० देशांमध्ये पोहचला आहे. भारतातही ६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे. तर दुसरीकडे देशात तीन कोरोनाचे ६३ रूग्ण आढळल्यानंतर सर्वांनीच दक्षता घेतली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.