Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनरवीना टंडनने असे का सांगितले, ‘दु:खी मनाने सांगावेसे वाटते की...?’

रवीना टंडनने असे का सांगितले, ‘दु:खी मनाने सांगावेसे वाटते की…?’

raveena tandon, bollywood actressआता अभिनेत्री रवीना टंडन हिनेदेखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. रवीनाने म्हटले की, ‘प्रसिद्धीच्या झोतात वावरणारा कोणताही व्यक्ती लोकांच्या टीका सहन करण्यास नेहमीच तयार असतो. परंतु जर त्याने त्यास उत्तर दिले तर लोकांचा बांध तुटतो. सोशल मीडियावर तो ट्रोलिंगचा विषय बनतो. त्यामुळेच मी ट्रोलर्सबद्दल शांत राहणे पसंत करते. मात्र माझ्या शांत स्वभावाला लोकांनी कमजोरी समजू नये.’ रवीनाने तिच्या या ट्विटच्या माध्यमातून एकप्रकारे ट्रोलर्सलाच उत्तर दिले. त्याचबरोबर तिने ट्रोलर्सला अप्रत्यक्षपणे इशाराही दिला. 

रवीनाने मंगळवारी ट्विट करून आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. रवीनाने तिच्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, ‘तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हाही लोक तुमच्यावर टीका करणे थांबवित नाहीत. कारण तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा लोक असे म्हणतात की, या व्यक्तीकडे स्वत:चा आवाज नाही. दु:खी मनाने सांगावेसे वाटते की, ट्विटर केवळ ट्रोल म्हणजेच अभद्रतेचे ठिकाण बनले आहे.’

दरम्यान, रवीनासह अनेक सेलिब्रिटींना ट्रोलर्सचा फटका बसला आहे. या अगोदर ऋचा चढ्ढा, ट्विंकल खन्ना यांनी ट्रोलर्सला खडेबोल सुनावणारे ट्विट केले. परंतु अशातही त्यांच्यावर ट्रोलर्सकडून टीका सुरूच आहे. आता या यादीत अभिनेत्री रवीना टंडनचे नाव जोडले गेले असून, ट्रोलर्स त्यास कशा पद्धतीने उत्तर देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments