Monday, May 6, 2024
Homeमनोरंजनऐश्वर्या ‘दहा’ वर्षापुर्वीच्या वादामुळं सोनमच्या लग्नास गैरहजर

ऐश्वर्या ‘दहा’ वर्षापुर्वीच्या वादामुळं सोनमच्या लग्नास गैरहजर

चार वर्षांचं रिलेशनशिप, कुटुंबियांची संमती आणि अनेकांचे शुभाशिर्वाद या साऱ्याच्या जोडीने अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांनी सहजीवनाला सुरुवात केली आहे. मेहंदी, संगीत अशा समारंभानंतर अखेर सोनम आणि आनंदच्या लग्नाचा दिवस उजाडला. माध्यमांपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी या दिलखुलास आणि मोठ्या मनाच्या अभिनेत्रीच्याच लग्नाच्या चर्चा पाहायला मिळाल्या. सोनमच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींनीही गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कपूर कुटुंबातीच प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. त्याशिवाय सोनमला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा म्हणजेच बी- टाऊन सेलिब्रिटींचा उत्साहही ओसंडून वाहत होता.

बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा- बच्चन यांनीही बॉलिवूडच्या फॅशनिस्टाच्या लग्नाला हजेरी लावली. पण, या गर्दीत ऐश्वर्या राय बच्चन मात्र कुठेच दिसली नाही. त्यामुळे ती नेमकी का आली नसावी, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला. दहा वर्षांपासून सोनम आणि ऐश्वर्यामध्ये एका ब्रँडमुळे झालेल्या वादाचेच हे पडसाद असल्याचं म्हटलं जात आहे. सोनमने त्यावेळी ऐश्वर्याला ‘आँटी’ म्हणत चिढवलं होतं. त्याशिवाय ‘कान’ चित्रपट महोत्सवासाठी एका मोठ्या कॉस्मेटिक ब्रँडच्या ब्रँड अँम्बेसिडरपदीही तिने ऐश्वर्याची जागा घेतली होती. तेव्हापासून या दोन्ही अभिनेत्रींच्या नात्याच दुरावा आला होता.

मुख्य म्हणजे सोनमने हे सर्व रागरुसवे दूर सारत ऐश्वर्याला लग्नासाठी बोलावणं पाठवलं होतं, फोनवरुनही तिने ऐश्वर्याला आमंत्रित केलं होतं. पण, ऐश्वर्याच्या मनात मात्र या वादाची सल अद्यापही कायम असल्याचंच इथे स्पष्ट होत आहे. ऐश्वर्याचं या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याला न येणं अनेकांनाच खटकलं हे मात्र तितकच खरं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments