मुंबई: पुरुषांचे प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे असून त्यांनी महिलांवरील घृणास्पद अत्याचार थांबवायला हवे, अशी प्रतिक्रिया मराठी लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरने कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी दिली.
‘एक मुलगा, नवरा, मुलीचा बाप आणि नागरिक म्हणून मला न्यायालयाच्या या निर्णयाने खूप समाधान मिळाले. बलात्काराचा गुन्हा करणाऱ्यांना अशा पद्धतीचा चाप बसायलाच हवा. निर्भया प्रकरणाच्या वेळीही मी एकप्रकारची हताशा अनुभवली होती. आता कोपर्डी प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा मिळाली, याचे समाधान आहे,’ असे चिन्मय म्हणाला.