मुंबई – काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा गोष्टींना सुजाण जनतेनी बळी पडू नये असं आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केलं आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्वांनी संयम राखावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
संभाजी छत्रपती बोलले आहेत की, ‘छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने इथे राहतात, सर्वजण नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी असतात. पण अशा परिस्थितीत काही विघातक शक्तींकडून समाजात तेढ निर्माण केले जात असून अशा गोष्टींना सुजाण जनतेनी बळी पडू नये. माझे सर्वांना आवाहन आहे की,कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्वांनी संयम राखावा’.