मावळ: भाजपाच्या महामेळाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करण्यात धन्यता मानली. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल, अशा शब्दांत टीका करत तुम्ही चमच्याने दूध पित होता, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.
सत्तेमधील सर्वच लोक फसवणूक करणारे आहेत. या सरकारने सर्व आश्वासनांबाबत मोठा यु टर्न घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० लाखांचा कोट घालतात. ते म्हणतात मी चौकीदार आहे. मग चौकीदार एवढे महाग कपडे कसे घालतात? – @AjitPawarSpeaks #HallaBol #मावळ #पुणे #पश्चिममहाराष्ट्र pic.twitter.com/ZjD1YruOVa
— NCP (@NCPspeaks) April 11, 2018
या सरकारने दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. भाजपचा इतिहास रंगवून सांगितला गेला आहे. भाजप-सेनेचे उदात्तीकरण केले गेले आहे. मुलांना चुकीचा इतिहास शिकवणे योग्य नाही. – @AjitPawarSpeaks #HallaBol #मावळ #पुणे #पश्चिममहाराष्ट्र pic.twitter.com/i5FqfjRjR1
— NCP (@NCPspeaks) April 11, 2018
भाजपने तीन साडे वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच कळत नाही. या कालावधीत यांनी लोकांची फक्त फसवणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलण्याचा सोयीस्कर कार्यक्रम या सरकारने राबवला आहे. या सरकारला खाली खेचणे आता गरजेचे झाले आहे. भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल. तुम्ही चमच्याने दुध पित होतात तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
तटकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. भाजपाने साडेतीन वर्षांत सरकार चालवले की मनोरंजन केले हेच कळत नाही. या कालावधीत या सरकारने लोकांची फसवणूक केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलण्याचा सोयिस्कर कार्यक्रम या सरकारने राबवला आहे. या सरकारला खाली खेचणे आता गरजेचे झाले असल्याचे ते म्हणाले. भाजपाच्या मेळाव्या शरद पवारांवर टीका करणारे फडणवीस जेव्हा चमच्याने दूध पित होते, तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, असा टोला त्यांनी लगावला.