शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वांद्रेतील हॉटेल ट्रायडंटमध्ये सत्तास्थापण्यावरून खलबतं सुरु आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवीन महाशिवआघाडी सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे भेटीगाठींचा सिलसिला जोरात सुरु आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विनायक राऊत, सुभाष देसाई आणि काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये हॉटेलमध्ये चर्चा सुरु आहे. काल रात्री उध्दव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट झाली होती. आज राज्यातील नेत्यांची चर्चा सुरु आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे कॉमन मिनीमम प्रोग्रावर चर्चा सुरु आहे. कालच उध्दव ठाकरे यांनी भाजवर तोफ डागली होती. तसेच राष्ट्रपती राजवटीवरून राज्यपालांनाही टोला लगावला होता. आज शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून लवकरच तिन्ही पक्ष सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरा या पक्षांकडे लागल्या आहेत.