मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
सत्तासंघर्षाचा पेच कायम असल्यामुळे दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी संवाद साधला. तर सकाळी सोनिया गांधीचे सल्लागार खासदार अहमद पटेल यांच्याशी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत भेट घेतली.
काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. त्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेला जवळपास पाठिंबा देण्याचं नक्की झालं आहे. त्यामुळे घोषणेची उत्सूकता लागलेली आहे.