Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान: शिवसेना

भाजपच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान: शिवसेना

Maharashtra sanjay raut
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सत्तेसाठी जनादेश दिला. मात्र, विरोधी पक्षात बसू पण मित्रपक्षाशी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान केला आहे. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

राज्यपालांनी १०५ जागा असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी ४८ तास दिले असताना शिवसेनेला मात्र २४ तासांचीच वेळ दिली, असे म्हणत राज्यपालांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असेही राऊत म्हणाले. तरी सुध्दा आम्ही राज्यपालांच्या आदेशाचं पालन करु. असेही राऊत म्हणाले.

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आपण दोन्ही पक्षांना करत असल्याचे राऊत म्हणाले. राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असताना युतीची सत्ता राज्यात स्थापन न होण्याबाबत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर खापर फोडू नये असे राऊत म्हणाले.

ही स्थिती भारतीय जनता पक्षाच्या अहंकारामुळे निर्माण झाली असल्याचे म्हणत राऊत यांनी या परिस्थितीसाठी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शिवेसेनेविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असल्याचेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments