नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेच्या चर्चा सुरु असताना, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. अशी चर्चा सुरु होती. पत्रकारांनी राऊतांना याबाबत विचारले. अशी माहिती तुम्हाला मिळते आहे आम्हाला नाही. न झालेल्या चर्चेच्या बातम्या बाहेर येऊ नयेत. उगाचच गोंधळ निर्माण करु नका. असं राऊतांनी पत्रकारांना उत्तर दिलं.
राऊतांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. याच वेळी त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, यापुढे सत्तास्थापनेच्या सगळ्या चर्चा या मुंबईत होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष विकासासाठी एकत्र आले आहेत.
तीन पक्षांचा निर्णय पक्का आणि अंतिम आहे. एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी हे राज्य आम्हाला चालवायचं आहे आणि पाच वर्ष चालवायचं आहे. अशा प्रकारची भूमिका ठरली आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.