मुंबई : मुख्यमंत्रीपदावर शिवसेना आक्रमक झालेली असताना महायुतीमधील घटकपक्ष रिपाईला दोन मंत्रीपद पाहिजेत. अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महायुतीमध्ये रिपाईला चार जागा सोडण्यात आल्या होत्या. परंतु रिपाईचा एकही उमेदवार निवडूऩ आला नाही. आता आठवलेंनी रिपाईसाठी एक कॅबिनेट, एका राज्यमंत्रीपद मागितले आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. त्यावेळी मंत्रीपदावर चर्चा होईल असेही ते म्हणाले.
महायुतीमध्य शिवसेना, भाजपात वाद सुरु असताना आता मित्र पक्षांनी तोंडवर केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.