Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणाले...आज महात्मा गांधी असायला हवे होते !

राज ठाकरे म्हणाले…आज महात्मा गांधी असायला हवे होते !


महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोघांच्या  जयंती निमित्त ट्विट करीत अभिवादन केले.

राज ठाकरे ट्विटमध्ये म्हटले, “‘आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते… ‘ असं प्रत्येक भारतीयाला गेली ७ दशकं वाटत राहिलं ह्यातच गांधींजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद दिसून येते. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.”

राज ठाकरेंच्या या अभिवादनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.  कारण राज ठाकरे हे भाजप सरकारवर नाराज आहेत. देशातील हत्या, भ्रष्ट्राचार, महिलांवरील अत्याचार, महागाई, आर्थिक संकटामुळे देशात भयावह परिस्थितीती निर्माण झाली आहे. या सर्वांचा रोष राज ठाकरेंच्या मनात असून त्यांनी आज देशात गांधी असते तर अशा प्रकारचे ट्विट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments