औरंगाबाद : सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. सरकारच्या धोरणावर शेतकरी संतप्त झाले असून, १ मार्चपासून शेतकरी संप पुकारणार असल्याचा इशारा औरंगाबादमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत रघुनाथ पाटील यांनी दिला.
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संप करणार असल्याची घोषणा शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी औरंगाबादमध्ये केली. शेतकरी यांच्या ज्या विविध मागण्या होत्या त्याची सरकारने पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला. त्यामुळे १ मार्चपासून पुन्हा शेतकरी असहकार आंदोलनात जातील आणि शेतकरी शासन आणि नागरिकांना सहकार्य करणार नाही. ग्रामीण भागातून कोणतीच गोष्ट शेतकरी शहरात येऊ देणार नाही असा इशाराही रघुनाथ दादांनी दिला.