मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपदावरून आमदार मंगल प्रभात लोढांना हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लोढा यांच्या कामगिरीवर मुंबईतील भाजपचे नेते नाराज आहेत. त्यामुळे सहा महिण्यातच मुंबई भाजपला अध्यक्ष बदलण्याची नामुष्की ओढावली आहे.
आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा १९ जुलै रोजी सांभाळली होती. मात्र, लोढा यांनी पक्ष वाढीसाठी कोणतेही काम केले नाही. पक्षासाठी लोढा वेळ देत नाही असा आरोप त्यांच्यावर पक्षातील मंडळींनीच केला आहे. पुन्हा आमदार आशिष शेलार यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे लोढा यांच्याविरोधात पक्षामध्ये नाराजी उमटत आहे.
भाजपने आज संध्याकाळी पदाधिका-यांची भाजप कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना हटवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपचे अध्यक्षपद पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरु आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपला सहा महिण्यातच अध्यक्ष बदलावा लागत आहे. अशीही जोरदार चर्चा सुरु आहे.