महत्वाचे…
१. सोलापूरच्या शीतल हॉटेलजवळ ही घटना घडली
२. रानडुकराला वाचवितांना घडला अपघात
३. सात जण गंभीर जखमी
सोलापूर: औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परत निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रानडुकराला वाचवितांना घडला.
सोलापूरच्या शीतल हॉटेलजवळ ही घटना घडली. औरंगाबाद येथे मागील दोन दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांचा इज्तेमा सोहळा सुरू होता. सोमवारी दुवा संपल्यानंतर दुपारी सर्व भाविक आपआपल्या गावी परत निघाले होते. त्यानंतर कर्नाटक व सोलापूर येथील मुस्लिम बांधव आपल्या गावी परतत असताना आज पहाटे ५:३० वाजता हा अपघात घडला. रस्तयावर अचानक रानडुक्कर आल्यामुळे चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्तयावर प्राथ:विधीसाठी कार उभी होती. त्या कारमधील ३ तर मागून धडकलेल्या गाडीतील २ असे पाच भाविक ठार झाले. सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.