औरंगाबाद: शिवज्योत नेतांना कोल्हापुर येथे घडलेल्या दुर्घटनेतील मयत व जखमींना तात्काळ मदत करावी. अशी मागणी औरंगाबाद राष्ट्रवादी कांग्रेस महीला विभागातर्फे अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली.
त्याचप्रमाणे हा अपघात ज्या वाहणामुळे घडला अशा वाहन चालकावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवा असे निवेदन औरंगाबाद पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना देण्यात आले निवेदन देण्यापुर्वी क्रांतीचौक येथे या दुर्घटनेतील मयतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संपूर्ण राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी होत असतांना काही कुटुंबियांवर शोककळा पसरली त्यांच्या कुटुंबीयाना शासनाने भरीव मदत जाहीर करावी असेही या निवेदनात म्हटले आहे. महीला शहर अध्यक्षा मेहराज पटेल यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय, महीला जिल्हा अध्यक्षा डॉ अनुपमा पाथ्रीकर, सोशल मीडिया मराठवाड़ा प्रदेश चिटणीस जावेद खान, कामगार प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दारकोंडे, विनाताई खरे, मंजूषा पवार, शमा परवेज,शकीला खान, सलमा बानो, अॅड सुवर्णा मोहीते,सरताज सय्यद, अनिसा बाजी, जैबुन्नीसा बाजी,अख्तर पटेल, अमोल गवळे, धनंजय वाघ आदींची उपस्थिति होती.