मुंबई : अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेसोबत निर्णय झाला नव्हता. मी स्वत: आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना याबाबत विचारले असता त्यांनीही सांगितले अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती.
फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाही असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवसेनेला आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मात्र विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत दररोज सकाळ,दुपार आणि संध्याकाळ चर्चा करत होते. असंही फडणवीस म्हणाले.
आमच्यावर विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचे आरोप झाले. परंतु आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. नवं सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली येईल असंही फडणवीस म्हणाले. आम्ही लगेचचं सरकार देऊ शकलो नाही अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली. मात्र जो पर्यंत नवं सरकार येत नाही तो पर्यंत मी मुख्यमंत्रीपदी काम करेल. परंतु मला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही. तसेच विरोधी पक्षाचेही आभार फडणवीस यांनी मानले.