मुंबई : शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या भूमिकेवर ठाम असतात. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या भूमिकेवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करून दाखवावं, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलं.
शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही, शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. असंही राऊत यांनी सांगितलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना लगावला. ‘जर जनादेश महायुतीला मिळाला आहे, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप पुढाकार का घेत नाही?,’ असा सवाल राऊत यांनी केला. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव यांनी जी भूमिका मांडली होती, त्यात कुठलाही बदल झालेला नाही,’ याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला.
जनादेश केवळ युतीला नव्हे तर युतीसंदर्भात जे-जे धोरण ठरलं आहे, त्या सगळ्याला मिळाला आहे, हे लक्षात घ्यायला हवं,’ असं राऊत म्हणाले. राज्यात लवकरात लवकर सरकार निर्माण व्हावं. त्या सरकारला ताकद देण्याचं काम शिवसेना करेल,’ असंही ते म्हणाले.