Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेश‘आता वाघाला गोंजारु नका; उध्दव ठाकरेंनी शहांना फटकारले!

‘आता वाघाला गोंजारु नका; उध्दव ठाकरेंनी शहांना फटकारले!

Udhav Thakeray, Amit Shah, shiv sena, bjpमुंबई: शिवसेना आमच्या सोबत रहावी अशी आमची इच्छा आहे, असं सांगत मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या भाजपला शिवसेनेने फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंजऱ्यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ असं स्पष्ट करत भाजपबरोबर युती न करण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

भाजपच्या स्थापना मेळाव्यात मुंबईत येऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्ट केलं होते. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपबरोबर युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे.

भाजपचे बिनपंखाचे विमान…
२०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजप अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे. भाजपला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही, असा टोला हाणतानाच सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत!, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.

उद्धव यांची भूमिका
भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. भाजपचा स्थापना दिवस सोहळा मुंबईत साजरा झाला. त्या निमित्ताने अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. स्थापना मेळावा प्रचंड झाला. सत्ताधाऱ्यांना साजेशा श्रीमंती थाटात झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच. ६ एप्रिल १९८० रोजी ‘भाजप’ची स्थापना झाली तेव्हा गोधडीत असलेले अनेक जण कालच्या मेळाव्यात व्यासपीठावर स्थानापन्न होते. मात्र ज्यांनी भाजपची स्थापना केली आणि ज्यांच्या कष्टामुळे भाजप वाढला ते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर नेते ‘हयात’ असूनही व्यासपीठावर तर सोडा, निमंत्रितांमध्येही दिसले नाहीत.  या स्थापना दिवसासाठी जी प्रचंड गर्दी जमली होती त्यात हे ‘चेहरे’ हरवलेलेच होते. पुन्हा या गर्दीने दोन दिवस मुंबईच्या जनजीवनास ‘बूच’ लावला. संतापलेला नोकरदार मुंबईकर रस्त्यावर उतरला व भाजप स्थापना दिवसास निघालेल्या गाड्या अडवून निषेध केला. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचीही यानिमित्ताने वाट लागली. अनेक रेल्वे स्थानके, मुंबईतील परिसर ‘घाण’ झाला व त्याची छायाचित्रे इतर वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केली आहेत. पन्नास कोटी रुपये खर्च झाला असे म्हटले जाते ते कितपत खरे आहे? कारण मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेळाव्यास आलेल्या झुंडीच्या झुंडी रेस्टॉरंटमध्ये घुसत होत्या व मनाप्रमाणे खाऊन ‘बिल’ वगैरे न देत बाहेर पडत होत्या. त्यामुळे हॉटेलवाल्यांना भुर्दंड सोसावा लागला, पण सरकार पक्षाचा मेळावा असल्याने हे सर्व गृहीत धरायलाच हवे.
अमित शहांचे भाषण दमदार झाले व त्यांनी भाजप विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. भाजपचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आल्याचा विचार अमित शहा यांनी मांडला. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी भाषणात सांगितले की, त्यांचे सरकार सिंहाचे आहे. सिंहालादेखील भूक लागते व सिंहाचा वाटा इतरांपेक्षा मोठा असतो हे मुंबईत आलेल्या सिंहांनी दाखवून दिले. भाजपचा सुवर्णकाळ सध्या सुरू असल्याने ‘उपाशी’ राहायचे नाही व नोटाबंदी वगैरेंची फिकीर करायची नाही हे तर ओघाने आलेच.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments