कोलकाता: त्रिपुरामध्ये भाजपचा विजय नसून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली. २०१९ मध्ये भाजपचा पराभव होईल असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये आघाडी करण्यासाठी सांगितली होती. पण त्यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं ममतांनी म्हटलं आहे. हा भाजपचा विजय नसून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१९ मध्ये भाजपचा पराभव होईल असा दावा त्यांनी केला आहे. अंहकार, अनैतिकता आणि पूर्णपणे गुडघे टेकल्यामुळे हा पराभव झाला. भाजपाने त्रिपुरामध्ये पाण्यासारखा पैसा ओतला. ईव्हीएममध्ये गडबड केली.’ममतांनी पुढे म्हटलं की, ‘मी राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेस आणि तेथील छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा आग्रह केला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जर आघाडी झाली असती तर भाजपला थांबवता आलं असतं.