नवी दिल्ली – शेतकऱ्यांचा प्रश्न हा एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नसून संपुर्ण भारतातील शेतकऱ्यांचा असल्याचे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत धडकलेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर बोलत होते.
आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असे जवळपास १८० किमीचे अंतर पायी कापत आझाद मैदानात धडकलेल्या ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या मोर्चाने शेती प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. अनेक राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा देत असून काँग्रसने देखील मोर्चाला पाठींबा दर्शवला आहे.