नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये कट रचण्यात आल्याचा दावा फारुख अब्दुल्ला यांनी फेटाळून लावला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानची बाजू घेत पाकिस्तान कधीच षडयंत्र रचत नसल्याचा अजब दावा केला. उलट नरेंद्र मोदीच पाकिस्तानात गेले होते अशी टीका केली.
पत्रकारांनी मोदींचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानात कट रचण्यात आला होता का ? असं विचारलं असता फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ‘ते स्वत: पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तान कोणतंच षडयंत्र रचत नाही’. पुढे ते म्हणाले की, ‘हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी नव्या पक्षाला संधी मिळते, त्यामुळे यात काही नवीन नाही. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण काही लोकांनी जर काही गोष्टी बोलल्या नसत्या तर काँग्रेस गुजरातमध्ये जिंकली असती. त्यांनी चांगली कामगिरी केली’.