विजयवाडा – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. केंद्राने राज्यावर कायम अन्याय केल्याची भावना नायडू यांनी व्यक्त केली.
तेलुगु नववर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नायडू बोलत होते.
आपण जरी देशाच्या राजकारणातील वरिष्ठ नेते असलो, तरी कधीही पदाचा अहंकार बाळगला नाही अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. राज्याला पुरविण्यात येणाऱ्या निधीचा आढावा घ्यावा आणि निधीत वाढ करावी एवढीच मागणी होती.मात्र, तरीही केंद्राकडून अन्याय सुरू असल्याचे नायडू म्हणाले. टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीच २ मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.