शिमला : येथील रोहडूजवळील कुशैनी गावात पहाटे ३ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत ४१ घरे जळून खाक झाली आहेत. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
कुशैनी गावात १५० ते २०० घरांची वस्ती आहे. पहाटे तीन वाजताच्या सुमारास घरांना आग लागल्याची बातमी कळताच पोलीस दल गावात दाखल झाले. गावकरी व पोलिसांनी अथक परिश्रमाने आग विझवली.
गावात अग्निशामक दलाचा एक बंब दाखल झाला, परंतु आग विझवण्यासाठी पाणी अपुरे पडले. त्यानंतर लोकांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या अग्निकांडात अनेक कुटुंबे बेघर झाली असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.