नवी दिल्ली | गुजरात निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून नेतेमंडळींनी तिखट शब्दात एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. मोदींच्या गुजरातमध्ये अन्नदाताच (शेतकरी) बेरोजगार झाला असून शेतकऱ्यांना सावत्र भावासारखी वागणूक का दिली जाते, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
22 सालों का हिसाब#गुजरात_मांगे_जवाब
प्रधानमंत्रीजी- 9वाँ सवाल:
न की कर्ज़ माफ़ी
न दिया फसल का सही दाम
मिली नहीं फसल बीमा राशि
न हुआ ट्यूबवेल का इंतजामखेती पर गब्बर सिंह की मार
छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकारPM साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार?
— Office of RG (@OfficeOfRG) December 7, 2017
नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील चांगलेच सक्रीय झाले. राहुल गांधी दररोज ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला प्रश्न विचारतात. गुरुवारी राहुल गांधी यांनी ९ वा प्रश्न विचारला. न की कर्ज़ माफ़ी, न दिया फसल का सही दाम, मिली नहीं फसल बीमा राशि, न हुआ ट्यूबवेल का इंतजाम, खेती पर गब्बर सिंह की मार, छीनी जमीन, अन्नदाता को किया बेकार, PM साहब बतायें, खेडुत के साथ क्यों इतना सौतेला व्यवहार? असे ट्विट त्यांनी केले आहे. तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफ केले नाही, शेतमाला भाव दिला नाही, पीक विमाही दिला नाही, गब्बर सिंगने शेतकऱ्यांनाही मारले, असा या ट्विटचा आशय होता.