नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. गेल्या चार वर्षात सरकारने पद्धतशीरपणे देशातील सीबीआय,न्यायपालिका तसेच इतर यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला, असा आरोप सोनिया गांधींनी केला.
देशात सत्ता बदलाचे वारे वाहु लागले आहेत. आम्ही खूप परिश्रमाने गुजरात निवडणुकांमध्ये आणि राजस्थान पोटनिवडणुकीमध्ये यश संपादन केले. मला खात्री आहे की आगामी कर्नाटक निवडणुकांमध्येही काँग्रसेच सत्ता राखेल, असा विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक गुरुवारी दिल्लीत पार पडली.यावेळी सोनिया यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.