skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रहे युध्द विषाणूंशी; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : उध्दव ठाकरे

हे युध्द विषाणूंशी; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray - Coronavirusमुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे ४७ रुग्ण झाले असून हे युध्द विषाणूंशी आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत. अनावश्यक प्रवास टाळावा. असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले केंद्र सरकारकडून पूर्णपूणे सहकार्य मिळत आहे. राज्यातील यंत्रणा सक्षम असून कोरोनाशी लढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. घाबरून जाऊन चालणार नाही. महाराष्ट्र खंबीर आहे. आपण सुरक्षित राहा, घर सुरक्षित ठेवा. बाहेरून येणारे जे नागरिक आहेत ते आपलेच बांधव आहेत. त्यांची काळजी घेण्याचं काम आपलंच आहे. राज्यात पुरेसा अन्नसाठा आहे. कुणीही घाबरुन जाण्याची गरज नाही. मंदिर,चर्च,मशीदी बंद झाल्या आहेत. लोकल बसची गर्दी अजून कमी होण्याची गरज आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments