मुंबई : कोरानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकासह ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
कोरोनाचा हैदोस बघता निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्वप्रथम एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. निवडणूक आयोगाने कोरोनाची स्थिती बघता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे सर्व इच्छूकांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे.